Tuesday, March 29, 2022
डोंगर पोखरणारे उंदीर
Friday, March 25, 2022
राजहट्ट पुनर्विकासाचा
Thursday, March 17, 2022
नवे शैक्षणिक धोरण - प्राध्यापकांची कसोटी
नवे शैक्षणिक धोरण केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसून ते प्राध्यापकांची कसोटी पहाणारे आहे. प्रथम वर्ष शाखेमध्ये विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र मिळणार आहे. स्वाभाविपणे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेला अर्हता त्याला मिळवून देण्यासाठी अभ्यासमंडळाला तसेच महाविदयालयीन पातळीवर प्राध्यापकांना तो सर्वप्रथम तयार करावा लागेल. तसेच त्यात अदययावतता आणावी लागेल. यामध्ये ४० ते ४४ क्रेडिट अभ्यासक्रमासंदर्भात दयायचे आहेत तर १० क्रेडिट कौशल्यविषयक गुणवत्तेसाठी आहेत. त्यामुळे प्राध्यापकांनी आपले शिकवणे केवळ पुस्तकी स्वरुपात करुन चालणार नाही तर त्यात व्यावसायिक कौशल्याचीही वैशिष्टये आणावी लागतील.
पुढील वर्षी म्हणजे व्दितीय वर्ष शाखेमध्ये
विद्यार्थ्यांला डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याच वर्षी विदयार्थी १८ वर्ष पूर्ण करतात त्यामुळे त्याला रोजगाराच्या संधी
उपलब्ध होतील. अशा संधी उपलब्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक गुणवत्ता
निर्माण होणे आवश्यक आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना ८८ क्रेटिड मिळवायचे आहेत. त्यामुळे अशा
प्रकारचा अभ्यासक्रम निर्माण करणे हे अभ्यासमंडळाचे काम असणार आहे. कदाचित विद्यार्थ्यांला रोजगार मिळाला तर त्याचे शिक्षण काही काळासाठी थांबणार
आहे, त्यामुळे जर एखादा विदयार्थी दोन किंवा चार वर्षांनी
परतला तर त्यांची नोंद महाविदयालयातील कार्यालयीन कामकाजामध्ये संग्रहीत ठेवावी
लागेलच पण विषयाच्या विभाग प्रमुखालाही अशा नोंदी करुन
ठेवाव्या लागतील. तसेच अभ्यास मंडळाला सुध्दा अशा प्रकारच्या निर्माण
होणाऱ्या प्रकरणांचा विचार करुन अभ्यासक्रम निर्मिती करावी लागेल.
तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांला पदवी प्रमाणपत्र
देण्यात येईल ज्यामध्ये त्याला १२० ते १३२ क्रेडिट मिळवायचे
आहेत. त्यामुळे हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे असणार आहे. जर
विद्यार्थ्यांनी तीन वर्षाची पदवी निवडली असेल तर त्याला दोन वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागेल आणि जर विद्यार्थ्यांने चार
वर्षाची पदवी निवडली असेल तर त्याला एक वर्षाचे पदव्युत्तर प्रमाणपत्र घ्यावे
लागेल. त्यामुळे चौथे वर्ष हे पूर्णपणे संशोधनाच्या स्वरुपाचे असून यामध्ये
विदर्याथ्यांला ४५ तास अभ्यासक्रमविषयक काम करायचे आहे, तसेच १६० ते १७६ क्रेडिट मिळवायचे
आहेत.
एम ए स्वरुपाचे शिक्षण देण्यासाठी महाविदयालयात तज्ज्ञ
प्राध्यापक असणे गरजेचे आहे. विदयार्थी तीन
वर्षापेक्षा चार वर्षाचीच निवड करतील कारण ते स्वतःच्या भवितव्याचा विचार करतील
त्यामुळे जे प्राध्यापक काम करणार आहेत ते पूर्णपणे अर्हताधारक असायला हवेत तसेच
त्यांनी स्वतःच्या अभ्यासक्रमासंदर्भात विविध प्रात्यक्षिके, कौशल्ये, बहि:शाल शिक्षणाचे पर्याय निर्माण करायला हवेत.
तिसऱ्या सेमिस्टर पर्यत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी काही विषय
अनिवार्य असतील परंतु चौथ्या सेमिस्टरपासून एक
मुख्य किंवा दोन संयुक्त विषयाचा परिपूर्ण अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागेल. याचा
अर्थ असा की जर विद्यार्थ्यांना एखादया विषयातील रोजगाराची संधी सापडत नसेल तर ते
एखादा विषय स्वीकारणार नाहीत. जरी विदयार्थी वाणिज्य शाखेत असला तरी त्यातील मुख्य
एक किंवा दोन संयुक्त विषयच प्रमाण असतील ज्यामुळे इतर विषयांना प्राधान्य राहणार
नाही. प्राध्यापकांना आपल्या विषयातील विविध गुणवैशिष्टयांना विद्यार्थ्यांपर्यत
पोहचवण्यासाठी काम करावे लागणार आहे.
अभ्यासमंडळाला सुध्दा ग्रामीण, नीमशहरी, शहरी आणि महानगरी असा विचार करुन अभ्यासक्रमामध्ये
विविध पर्याय दयावे लागतील.. ज्यामुळे विदयार्थी आणि प्राध्यापक यांना विविध
पर्याय खुले राहतील तसेच एखादया ग्रामीण विभागातील प्राध्यापकाने कौशल्यविषयक नवा
अभ्यासक्रम निर्माण केला असेल किंवा करणार असेल तर त्याला मान्यता देण्याची
प्रक्रिया सुलभ करायला हवी.
एकूणच नवे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या हिताचे
आणि प्राध्यापकांच्या कसोटीचे आहे. प्राध्यापकांच्या
एकूणच पारंपरिक कार्यपध्दतीमध्ये आलेला साचलेपणा यामुळे नाहीसा होणार आहे आणि
नव्या पध्दतीमध्ये प्राध्यापकांच्याही कलागुणांना आणि संशोधनात्मक कार्यपध्दतीला
आवाहन केले जाणार आहे.
१
https://vikaspedia.in/education/policies-and-schemes/national-education-policy-2020#:~:text=NEP%202020%20aims%20to%20increase,added%20to%20Higher%20education%20institutions.
२
https://en.wikipedia.org/wiki/National_Education_Policy_2020
३
https://www.thehindu.com/news/national/with-4-year-ug-research-degree-students-can-directly-enter-phd-ugc-draft/article65235074.ece
भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे
ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते. या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...
-
कार्यालयीन कामकाजाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाहीर निवेदन आणि माहितीपत्र या पत्रव्यवहाराला आपल्याला समजून घ्यावे लागते. कार्यालयाकडून एखाद...
-
प्रशासनात पत्र व्यवहाराला फार महत्वाचे स्थान असते. सर्व प्रकारचा व्यवहार हा कागदपत्रांच्या माध्यमात सुरू असतो. सध्या इमेल आणि ...
-
व्यवस्थापन कौशल्य समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयाची संपूर्ण माहिती असायला हव...